Monday, 13 February 2017

मराठा आरक्षण आणि मराठा मतदार

मराठा आरक्षण आणि मराठा मतदार
================

बोटावर मोजण्या ईतके मराठा लोक सोडले तर ईतर सर्वसामान्य मराठा समाजाची आजची स्थिती काय आहे ?
    मराठा समाज पिढ्यांपिढ्या शेतीवर गुजराण करत आला आहे . सत्ताधारी कुणीही असो सर्वांनीच शेतकरी समाजाच्या ( जो बहुसंख्य मराठा आहे ) तोंडाला पाने पुसली आहेत . शेतकऱ्यांच्या मागण्या कडे दुर्लक्ष केले आहे , कुठल्याही ठोस योजना राबवल्या नाहीत .
एकतर शेती व्यवसाय बेभरवशाचा , निसर्गावर अवलंबून , त्यातही शेतीमालाला हमीभाव नाही आणि यावर कडी म्हणजे दलाल पध्दत ... यात पिळवटलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले नाही तर नवलच ...!!!
आरक्षणाचा विषय निघाला की अनेक तथाकथित विद्वानांची ओरड सुरू होते .. मराठा सधन आहे , सामाजिक दृष्टीने उच्च आहे , राजकीय क्षेत्रात अग्रेसर आहे ....!!!
    अरे होय बाबा ..पण तुम्ही कुठल्या मराठ्यांच्या विषयी बोलताय ..??? आणि ते किती टक्के आहेत ...???   सर्वसामान्य मराठ्यांच्या विषयी यांना किती कळवळा आहे ...??? या लोकांना प्रतिनीधी मानून सर्व मराठा सधन वर्गात मोडतो का ...???
        मराठ्यांच्या एकूण लोकसंख्ये पैकी साधारणपणे ३०% मराठा आज भुमीहीन आहे , ५०% मराठा अल्पभुधारक आहे , १५% मराठा मध्यम वर्गीय जीवन जगत आहे तर ५% मराठा ज्यांना सधन म्हणतात अशा वर्गात मोडतो ...!!!
मराठा समाजाच्या अधोगतीची काही प्रमुख कारणे -
* आरक्षण -  सर्वसामान्य मराठा जो भुमीहीन किंवा अल्पभुधारक आहे , ईतका पिचलेला आहे की त्याला कुठली शाश्वत कमाई नाही .मजुरी करुन वा थोड्या फार जमीनीतील उत्पन्नावर उदरनिर्वाह करत आहे . या कचाट्यातुन सुटका मिळवण्यासाठी मुलांना चांगले शिक्षण द्यायचे झाले तर आरक्षण नाही तसेच फि भरण्याचीही ऐपत नाही . म्हणजे दोन्ही दरवाजे बंद ...
आई जेवण देत नाही आणि बाप भीक मागु देत नाही ...!!!
अशा कोंडीत सापडलेला सर्वसामान्य मराठा आज हतबल झालेला आहे .
     " अशक्त असलेल्या घोड्यांना वेगळा चारा देण्याच्या नादात पुर्वी जे सशक्त घोडे होते ते रोडावले आहेत ....!!!"   त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज अजूनही कुणाला जाणवल्याचे दिसत नाही ...!!!
   मान्य आहे आरक्षणाने समाजाचे सर्व प्रश्न सुटत नसतात पण गती मिळते हे निश्चित ...!!!
*राजकारणातील स्वकीय्य -
   हे लोक फक्त बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाचा वोट बँक म्हणून वापर करून घेतात . स्वतः मोठमोठी पदे पदरात पाडून गब्बर होतात . पण ज्यांच्यामुळे आपण या पदावर आहोत त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करतात ...!!!
अनेक सहकारी क्षेत्रे , शिक्षणसंस्था यांच्याकडे आहेत पण  सर्वसामान्य गरीब मराठ्यांच्या साठी येथे हक्काचे स्थान असावे असे त्यांना कधीही वाटले नाही . शक्य असतानाही गोरगरीब स्वकीय्यांसाठी त्यांनी काही केल्याचे जाणवत नाही ...!!!
विधानसभेत अर्ध्यापेक्षा जास्त आमदार मराठाच असतात तरीही मराठा समाज दुर्लक्षीत राहतो हे कशाचे लक्षण आहे ?

कालबाह्य बेदरकार वृत्ती  -
     २१ व्या शतकात १७ व्या १८ व्या शतका सारखे जगण्याची कला आजही अनेक मराठा तरुणांमध्ये दिसुन �येते...!!!
आजचे युग हे तांत्रिक शिक्षणाचे , स्पर्धेचे युग आहे . येथे पुर्वी असलेला रुबाब वा बेदरकारी वृत्ती बिनकामाची आहे हे बहुतेक मराठा तरुणांनी मनावर घेतल्याचे जाणवत नाही . उच्च शिक्षणाची आस धरून योग्य क्षेत्रात बस्तान बसवने ही काळाची गरज या तरुणांनी लक्षात घ्यायला हवी . शेती धारकांनी कृषी क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेतले पाहिजे , आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करायला पाहिजे .ज्यांच्याकडे लागवडी योग्य जमीन नाही त्यांनी ती विकुन वायफळ खर्च करण्या ऐवजी माहीती असलेल्या उद्योगात गुंतवणूक करावी , आपला आर्थिक पाया प्रथम मजबूत करून घ्यावा .
   असे न झाल्याने आज मराठा समाजाचे मागासलेपण प्रकर्षाने जाणवत आहे .
       महाराष्ट्राच्या एकुण लोकसंख्ये पैकी ३५% लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाचे उमेदवार तसेच मतदार महाराष्ट्रातील बहुतेक सर्व प्रमुख राजकीय पक्षात विभागले आहेत , हरकत नाही ...!!!
       आज योगायोगाने म्हणा ,राजकीय खेळी म्हणा किंवा आणि काही म्हणा पण  अनेक वर्षापासून असलेली मराठा समाजाची घुसमट कोपर्डी प्रकरणा पासून बाहेर पडत आहे , मराठा समाज कधी नव्हे तो एकत्र दिसत आहे ... ही चांगल्या गोष्टीची , समाजाच्या हिताची नांदीच म्हणावी लागेल ...!!!
    संपूर्ण महाराष्ट्रभर मराठ्यांचे महामोर्चे कुठलेही गालबोट न लागता पार पडत आहेत , प्रतिसाद प्रचंड आहे ...!!!
      हीच एकजुट पुढे टिकवून येणार्या सर्व निवडणुका मधे याचे पडसाद उमटले पाहिजेत, सरकार वर दबाव आला पाहिजे . यासाठी येणार्या सर्व निवडणुकात सत्ताधारी उमेदवारांना पराभुत करण्यासाठी निर्धार केला पाहिजे , येथे आपल्या जाती वा पक्षा विषयी असलेल्या सर्व वृथा भावना दुर सारून सत्ताधारी उमेदवारास तुल्यबळ असलेल्या उमेदवारास आपले बहुमुल्य मत द्यावे लागेल , भले मग तो कुठल्याही पक्षाचा असो वा कुठल्याही जातीचा ...!!!
संपूर्ण समाजाच्या हितासाठी असे कडवट निर्धार करण्याची वेळ आता आली आहे , त्याच्याशिवाय तुमच्याकडे कुणी डुंकूनही पाहणार नाही , अहो प्रत्यक्ष जन्मदाती आई सुद्धा आपल्या लहान बाळाला रडायला लागल्या शिवाय कडेवर घेत नाही , जोपर्यंत खेळतयं , बागडतयं तोपर्यंत ती त्याच्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही ...!!!
महाराष्ट्रात ३५% असलेला मराठा समाज जर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सत्ता फिरवू शकतो हे सर्व राजकीय पक्षांना समजुद्या ...!!!
    तुमच्या मतांवर पदे भुषयुन तुमचा वापर फक्त निवडणुका पुरता करणार्या सर्व पक्षीय मराठा नेत्यांना समजुद्या ...!!!
     मग पाहा कसे सगळे खडबडुन जागे होतात ...!!!
    हे एवढे सर्व मराठा बांधवांनी केले तरच " एक मराठा लाख मराठा "  हा एल्गार यशस्वी होईल यात शंका नाही ...!!!
        जयोस्तू जयोस्तू जयोस्तू ... हिंदू - मराठा ...!!!

आपलाच ,
एक मराठा ,
रविंद्र किसनराव झांबरे
होळकरवाडी , हवेली ( पुणे )

1 comment: