Friday, 5 August 2016

तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी

प्रचलित असलेल्या व नामशेष झालेल्या सर्व संस्कृती पेक्षाही हिंदू संस्कृती अति प्राचीन आहे . केवळ आपल्या सत्वबलानेच तिने आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवले आहे ...!!!
      काही आंधळे हत्तीची माहिती मिळवण्यासाठी गेले असताना त्यांच्या हाताला लागलेला एकएक अवयव हाच हत्ती आहे म्हणून भांडण करू लागले .
        त्याचप्रमाणे सनातन हिंदू संस्कृतीचा एकएक सिध्दांत उचलून अनेक भिन्न संप्रदाय प्रवर्तक हिच मुख्य संस्कृती आहे म्हणून भांडु लागले व आपापले संप्रदाय वेगळे केले . पुढे त्यातही फाटाफुट होऊन पुष्कळ मते मतांतरे झाली , अनेक फाटे फुटले . अशा या अनेक शाखोपशाखांनी सनातन आर्य संस्कृतीचा वटवृक्ष चोहीकडे फोफावला आहे .  पण ही यथार्थ भावना या पक्षोपक्षात नसल्याने ते विनाकारण आपसात द्वेष मत्सर करून कढतात व कुढतात ...!!!
       अंत:कलहामुळे तसेच परकीय आक्रमण व आघातामुळे ही संस्कृती पाहिजे तितकी जगभर पसरली नसली तरीही आपल्या विभुतीमत्वाने व महात्म्याने आजही विश्व मान्य व सुदृढ आहे ...!!!

एकिकडे आपल्या लोकांची ही अवस्था आहे तर दुसरीकडे मोठमोठे पाश्चिमात्य पंडीत हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाचे गोडवे गाताना थकत नाहीत .
" India is mother land of philosophy "
असे स्पष्ट पणे नमूद करतात .

मॅक्समुल्लर नावाचा पाश्चिमात्य पंडित म्हणतो , " If I were to look over the whole world to find out country most richly endowed with all the wealth , power and beauty that nature can betsow, I should point to India "
     " If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts , has most deeply pondered over the greatest problems of life and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied plato and Kant, I should point to India ."

_
" दिव्य सुखाच्या प्राप्ती करता आवश्यक असणार्या सर्व देणग्यांनी , सर्व गुणांनी पराकाष्ठेचा विकास पावलेले मानवी मन ज्या देशात आपल्या पुर्ण कलेने शोभायमान आहे , मानवी जीवनाच्या निगुढ व अति महत्वपुर्ण विषयांवर खोल विचार करून ही कोडी ज्या देशात अत्यंत समाधानकारक रितीने सोडवली आहेत . प्लेटो व कान्ट या सारख्यांच्या तत्वज्ञानाचा पुर्ण अभ्यास करून समाधान मिळवलेल्या पाश्चिमात्य पंडितांची मने सुद्धा ज्याकडे आकर्षीत होतात . अशा दिव्य तत्वज्ञानाचा जन्म कुठे झाला असे कुणी विचारले तर मी सरळ हिंदुस्थानकडे बोट करीन "
" And if I were asked myself from what leaturature , we here in Europe , who are natured almost exclusively on the thoughts of the greeks and Romans and the semetic race , the Jewish , may draw the corrective which is most wanted in order to make our inner life more perfect , more universal , in fact more truly human , a life not for this life only , but a transfigured and eternal life  . I again should point to India  "

-
     ग्रीक, रोमन, युनानी व ज्यू ईत्यादींच्या विचार धारेने परिपोषीत आम्ही युरोपियन ज्या एका वाङमयाचा आधार घेऊन ठाम सिध्दांताला पोहचू , आमचे परमार्थिक जीवन पुर्ण होण्यास ज्याची आम्हाला जास्त आवश्यकता आहे , ज्याच्या मुळे आमचे जीवन अधिक विश्वव्यापी होईल , मानवी जीवनाला सर्वोतोपरी अधिक अनुरूप ठरेल , आमच्या विद्यमान जीवनात अधिक सुधारणा घडून येईल , केवळ ऐहीक नव्हे तर अनादीसिध्द् दिव्य जीवनालाही जे कारणीभूत होईल , निरतिशय सुखाच्या प्राप्तीचे साधन म्हणून जे वाङमय कोणत्या देशात आपल्या परिपूर्ण रुपाने अवस्थीत आहे म्हणून जर कुणी मला विचारले तर आपोआपच माझे बोलणे पुन्हा एकदा हिंदुस्थान कडे वळेल "

जकोलीयट नावाचा युरोपियन विद्वान आपल्या " The Bible of India  "  या पुस्तकात म्हणतो ,
" Astonishing fact  !  The Hindu revelation  (Veda) is of all revelations , the over one whose ideas are in perfect harmony with modern science as it proclaims the slow and gradual formation of the world  "

-

" सर्व धर्म ग्रंथांमध्ये हिंदूंचा वेद हाच असा एक ग्रंथ आहे की ज्याच्या विचारात सावकाश पणे  सृष्टीचा क्रम उपदेश असल्याने आधुनिक विज्ञानाशी जुळतात . "

      व्हिलर विल्लॉक्स हा अमेरिकन विद्वान म्हणतो .....

       " We have all heard and read about the ancient religion of India . It is the land of Vedas , the most remarkable works  , containing not only religious ideas on perfect life but also facts which all the science has since prooved true . Electricity , radium, electrons and airships all seems to have been known to the seers who found Vedas "

-

" भारताच्या अति प्राचीन धर्मा विषयी आम्ही पुर्ण वाचले आणि ऐकले आहे . भारत हे त्या अत्यंत महत्वपुर्ण आणि श्रेष्ठ वेदांचे जन्मस्थान आहे की ज्यात संपूर्ण दिव्य जीवनाच्या धार्मिक तत्वांचे एक केवळ विवेचन नसुन आजपर्यंतच्या अखिल विज्ञान शास्त्रांनी सिद्ध करुन प्रचारात आणलेल्या व सत्य म्हणून विश्वासन असणार्या अखिल सिद्धांतांचे ही विवेचन आहे . वीज , रेडीयम , इलेक्ट्रॉन्स आणि विमाने ईत्यादीचे ज्ञान ही तपोबलाने वेदांचा शोध लावणार्या त्या वेदद्रष्ट्या ऋषींना होते असे आढळते . आधुनिक विज्ञान शास्त्र म्हणजे वेदातील अबधित सिध्दांतांचे केवळ अनुकरण होय . "

     शोपेनहार युरोपियन विद्वान म्हणतो  -

     " In the whole world there is no study so beneficent and so elevating as that of Upnishadas .   It has  been the solace of my life and it will be solace of my death . "

-

   " मनुष्याच्या मनोभुमिकेस पराकाष्ठेच्या उन्नतीस पोहोचवून मानव जातीवर मोठे उपकार करणार्या या उपनिषदांच्या अभ्यासा खेरीज सर्व जगात ईतका लाभकारक व उन्नतीकारक असा कोणताही श्रेष्ठ अभ्यास नाही . उपनिषदेच माझ्या जीवनाचे समाधान , यांच्या आश्रयानेच मी नितांत सुख- समाधानाचे दिव्य जीवन अनुभवीत आहे . यांच्या छत्राखालीच शेवटी निरातीशय सुखशांतीने मी देहत्याग करीन . "
.
.
     भगवदगिते विषयी युरोपियन काय म्हणतात ते पाहा .......
हंबोल्स  -  
" Bhavatgita is the most beautiful , perhaps properly the only true philosophical song that exist in any known tongue . "
-
सर्व दृष्टीने अतिशय सुंदर किंबहुना जगातल्या सर्व भाषातील गितांमध्ये खर्या तत्वज्ञानाचा सर्वोतोपरी योग्य असा कोणता काव्य ग्रंथ असेल तर फक्त भगवदगिता . "

* वॅरेन हास्टींग्ज  - 
      " There is In Bhagvatgita , a sublimity of conceptions , reasoning and diction almost unequalled  "
-

     " गांभीर्यपुर्ण विचारसरणी , मनाला पटण्या सारखे विवेचन आणि लयबध्द छंद ईत्यादीकांनी भगवदगिता हा ग्रंथ जगात बिनतोड आहे ."

   * जर्मन विद्वान थोरो -  
    " Where is fear? when mother Geeta is there to protect ...!!! "
-

   " प्रत्यक्ष गितामाताच ईथे रक्षण करण्यासाठी निकट असताना भिती कधी शिल्लक राहणार ...??? "

        पुर्वी अनेक परकीय आक्रमकांनी येथे आपल्यावर राज्य करुन परस्परा मध्ये द्वेष वाढवला . ' विभाजन आणि शासन ' ( Divide and rule  )  हे तत्व आमलात आणून वाटेल त्या मार्गाने राज्य केले . आपण सर्वच त्यांच्या या कारस्थानाला बळी पडलो आणि आपसातील मत्सर वाढवत राहुन भांडत बसलो . आपल्या संस्कृती मधील चांगल्या गोष्टी बाजूला ठेऊन नको त्या अर्धवट गोष्टी उचलून वाद घालत  राहीलो ...!!!
    पण आता आपसातील सर्व भेदभावना आणि कुटील राजकारण बाजूला ठेवून बंधुत्वाच्या हार्दिक प्रेमाने परस्परांशी वागत आपल्या पवित्र संस्कृतीचा ध्वज उन्नत करून या उपदेशांचे निरवधी भाग्य अखिल विश्व लोकांना लाभो या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया ...!!!

-

   रविंद्र किसनराव झांबरे , मु.पो. - होळकरवाडी , हवेली , पुणे .
मो.- 9881917003

email- ravindrakzambare@gmail.com